- Posted On 22 July 2013
- By
- In Entertainment
दिग्दर्शक : संजय जाधव
कलाकार : स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी,जितेंद्र जोशी,सुशांत शेलार,उर्मिला कानिटकर, सई ताम्हणकर ,रिचा ,संदीप कुलकर्णी ,वर्ष उसगावकर , उदय टिकेकर ,उदय सबनीस.
संगीत : अमितराज, समीर सपतीस्कर ,पंकज पुष्कर.
कथा : सुहास शिरवळकर ( कादंबरी : दुनियादारी )
पटकथा /सवांद : चिन्मय मांडलेकर .
"दुनियादारी" , चेकमेट नंतर दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिलेला अजून एक सुंदर मराठी चित्रपट.
हा चित्रपट सुहास शिरवळकर लिखित कादंबरी "दुनियादारी" वर आधारित आहे हे आपल्या सगळ्यांना च माहित आहे.
"जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद, दु:ख, प्रेम-मत्सर.. या भावना मानवी मनात अनंत आहेत; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, तो पर्यंत ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली कथा अजरामर राहणार आहे"
त्यामुळेच ह्या चित्रपटाकडून हि लोकांच्या ह्याच अपेक्षा होत्या , ज्या पूर्ण करण्यात संजय जाधव जवळपास यशस्वी ठरलेला आहे. दहा वर्षांपूर्वी आलेली सतीश राजवाडे दिग्दर्शित "दुनियादारी" हि मालिका हि ह्याच कादंबरीवर आधारित होती. त्यामुळे लोकांना माहित असलेली कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दाखवणे हे एक प्रकारे आव्हानच होते. सर्वच कलाकारांनी खूप सुंदर अभिनय करत संजय ला सुरेख साथ दिलेली आहे.
मुंबई चा "श्रेयस" शिक्षणासाठी पुण्यात येतो आणि नकळत दोन गटांच्या दुष्मनी मध्ये अडकून जातो. पण हे सगळे होत असताना निखळ मैत्री, प्रेम आणि "दुनियादारी" यांचा अनुभव श्रेयस च जीवनच बदलून टाकतो. चित्रपटाचा "लुक" जरी १९७०-८० चा असला तरी प्रत्येकाला हि दुनियादारी ओळखीची , अनुभवलेली वाटते.
त्यामुळेच सर्वांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत हि दुनियादारी एकदा तरी अनुभवायलाच हवी. (पण सिनेमागृहातच हा!) . चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या हि मनात "टिक टिक" वाजली का नाही आणि "तेरी मेरी यारी,मग ***** गेली दुनियादारी" अस वाटणारा मित्र/मैत्रीण आठवली का नाही ते नक्की कळवा.
- Tags :
- Bollywood
Posts To Read Next